काही जुनी मराठी गाणी ऐकली आज. चिंब पावसाने रान झालं आबादानी, चोरीचा मामला, हृदयी वसंत फुलताना, एकाच या जन्मी जणू, वगैरे वगैरे.. आणि खरंच पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं. आता अशी गाणी ऐकल्यावर खरंतर तरुण झाल्यासारखं वाटलं असं म्हणायला हवं, पण आम्ही अजून म्हातारे झालेलो नाहीत. आणि आता हि आणि अशी सर्व गाणी मी माझ्या लहानपणी ऐकली त्यात माझा काय दोष बुवा? तर लहानपणी टीव्हीला अगदी नाक लावून हे सारे चित्रपट पाहिले. या गाण्यांचा मतितार्थ तेव्हा नाही कळला, पण आज परदेशी आपल्या पाखरापासून (चाणाक्ष वाचकांच्या लक्षात हे यावे) दूर राहिल्यावर मात्र या गाण्यांनी आत कुठेतरी गोड विरहवेदना निर्माण केली. या गाण्यांचं संगीत खरोखर कालातीत आहे हे शंभर टक्के पटलं. अगदी बसल्याबसल्या मला त्या काळात हे असं फिरवून आणलं. नॉस्टल्जिक केलं.
No comments:
Post a Comment